नवी दिल्ली : लष्करी संघर्षादरम्यान भारताने मोठा निर्णय घेतला असून भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. त्यानुसार त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चपदस्थ अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी, चौहान यांनी सिंह यांना सुरक्षेच्या परिस्थितीची माहिती दिली होती. भारतावर आजवर पाकिस्तान पुरस्कृत अनेक दहशतवादी हल्ले झाले. त्याला भारताने प्रत्येकवेळी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पण, भारताला अनेकवेळा मोठे नुकसान सोसावे लागले आहे. तरीही अजावर दहशतवादी हल्ल्याला एक समस्या म्हणून गणले जात होते. पण, आता असे होणार नाही. यापुढे कुठलेही दहशतवादी कृत्य हे भारताविरोधातील ‘अॅक्ट ऑफ वॉर’ म्हणून गणले जाईल, अशी भूमिका भारताने घेतली आहे.
Fans
Followers